Latest News

Monday, March 28, 2016

सेंद्रीय शेती

शेती करण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीचा त्याग करून कल्पकतेने शेती करण्यासाठी तसेच शेतीचा उत्पादनखर्च कमी करून उत्पादनात वाढ करण्याची व शेतीपूरक व्यवसाय हाती घेण्याची गरज आहे. ह्यावरील उपाय म्हणून कमी खर्चाची, बिनकर्जाची, विषमुक्त, आरोग्यदायी उत्पादन देणारी, जमिनीची सुपिकता वाढवणारी सेंन्द्रिय शेती करणे जास्त फायदेशीर आहे.

ह्याकरीता अनिरुद्धबापूंनी ग्रामविकासाचा मंत्र दिला व काळाची पावले ओळखून ’अनिरूद्धाज्‌ इन्स्टिट्यूट ऑफ ग्रामीण विकास’ हया संस्थेमध्ये सेंद्रिय शेतीचा पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरु केला.


सेंद्रिय शेतीच्या अज्ञानामुळे तसेच सेंद्रिय शेतीपद्धत राबवल्यामुळे येणारे उत्पन्न कमी मिळेल ह्या भीतीपोटी शेतकर्‍यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीपद्धत व्यवस्थीत समजावून घेतल्यास शेतकर्‍यांना एक नवीन दिशा मिळू शकते.

ग्रामीण भागातील लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडेच असलेल्या उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे, कमी पैशांमध्ये व कमी खर्चात सेंद्रिय शेती कशी करायची हे अनिरुद्धबापूंनी आखून दिलेल्या ह्या अभ्यासक्रमात आपल्याला शिकायला मिळते. ह्याचे सर्वांत उत्तम उदहरण म्हणजे बापूंच्या संकल्पनेतील परसबाग. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षित अथवा अशिक्षित शेतकरी सहजरित्या सेंद्रिय शेतीकडे आकृष्ट होऊ शकतो व त्याच्या आधारे आपली परिस्थिती सुधारु शकतो.

How to do Videos


फोटोगॅलरी